स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; साताऱ्यात ऊस वाहतूक रोखली, साडेतीन हजार एफआरपीची मागणी
1071 views
सातारा चे व्हिडिओ सबस्क्राईब करासातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षाचे ४०० रुपये आणि चालू एफआरपी साडेतीन हजार जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत शनिवारी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड लुक्यातील वाठार आणि पाचवड फाटा येथे ऊस वाहतूक रोखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील वर्षीच्या उसाला ४०० रुपये आणि चालू वर्षाच्या उसाला ३ हजार ५०० पहिली उचल जाहीर करून कारखाने सुरू करा, अशी मागणी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत केली होती.