'मालवणी खोबरं' प्रॉडक्शनमधून २ मित्र कमावतायत १६ लाखांचा रुपये निव्वळ नफा
1080 views
सिंधुदुर्ग चे व्हिडिओ सबस्क्राईब करासिंधुदुर्गातील धनंजय राणे आणि तुषार चव्हाण या दोन तरूणांनी एकत्र येत नारळापासून बाय प्रॉडक्ट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केलाय. धनंजय राणे यांचं शिक्षण BE केमिकल झालं आहे तर तुषार चव्हाण यांच शिक्षण BE मेकॅनिकल झालं आहे. जिल्ह्यातील नारळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. नारळापासून काहीच होत नसल्यामुळे यांची उणीव धनंजय राणे यांच्या मनामध्ये कायम होती. त्यातूनच आपण नारळापासून बाय प्रॉडक्ट बनू शकतो अशी संकल्पना त्याच्या डोक्यात आली आणि त्यानंतर २०१५मध्ये त्यांनी खोबरं किसण्याची फॅक्टरी सुरू केली. या फॅक्टरीमध्ये मूळ उद्देश नारळाच्या खोबऱ्यापासून बनणाऱ्या सर्व बाय प्रोडक्ट बनवले जातात. त्यामध्ये खोबरं वाटी, खोबरं किस,खोबरेल तेल,खोबऱ्याची पावडर,वरचिग तेल,खोबरा वडी देखील बनवलं जात.हे सर्व बनविण्यासाठी गावातील महिलांना योग्य प्रशिक्षण दिले गेले आहे. या महिला सर्व खोबरं सुकविण्यापासून आणि इतर प्रॉडक्ट बनविण्यापर्यत काम करतायत.