'स्वच्छ' नाल्यांचा पाहणी दौरा रद्द करत पाण्याचा प्रश्न जाणून घेण्यासाठी मनसेचा दौरा
1774 views
ठाणे चे व्हिडिओ सबस्क्राईब कराठाण्यात मनसेच्या जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा शहरातील नालेसफाईचा दौरा आखण्यात आला होता.प्रत्यक्षात जेव्हा दौरा सुरू होणार तेव्हा मात्र नालेसफाई बऱ्याच अंशी झाल्याचं मनसे कार्यकर्त्यांना लक्षात आलं.मग मात्र जाधव यांनी अचानक पवित्रा बदलत पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे कारण देत डोंगरी पाडा इथला दौरा केला.यावेळी अविनाश जाधव यांच्यावर नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली.पाणी प्रश्न गंभीर असताना ठाणे स्मार्ट सिटी कशी काय? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.