विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात, मोडकळीस आलेली शाळा, त्यात केंद्र सरकारचा आदेश, मुलांचं भवितव्य अंधारात
1255 views
वाशिम चे व्हिडिओ सबस्क्राईब कराशाळेची अवस्था पाहून विद्यार्थ्यांच्या भविष्य खरच इथे घडणार का हा प्रश्न पडतो. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन इथे बसावं लागतं. बरं एवढं कमी होतं की काय म्हणून आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला वाशिम जिल्ह्यातील केंद्रीय विद्यालयाच्या जागेचा प्रश्न निकाली लावा अन्यथा शाळाच बंद करू असा इशाराच केंद्र सरकारनं राज्य सरकारला दिलेत. हे ईशारा पत्र केंद्रीय शिक्षण सचिव यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना लिहलं आहे.