सर्वात आधी बंडाचं निशाण, भावना गवळींच्या सलग ५ विजयांच्या ५ वेगवेगळ्या स्टोरी
1010 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले सुधाकरराव नाईक होते.. तिकीट मागताना पुंडलिकराव गवळींनी बाळासाहेबांसमोर एकच अट ठेवली होती.. तुम्ही मतदारसंघात एक सभा घ्या आणि मी काँग्रेसचा बालेकिल्ला ध्वस्त करतो अशी ती अट होती.. बाळासाहेबांनी सभा घ्यायचं ठरवलं.. जोरदार सभा झाली आणि पुंडलिकराव गवळींनी विजय मिळवला. चक्क महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला पाडलं.. यापुढे सुरू झाली ती गवळी कुटुंबाच्या एकहाती राजकारणाची स्टोरी.. आधी वडील आणि नंतर मुलीने मतदारसंघात कसं एकहाती वर्चस्व राखलं तेच या व्हिडीओत पाहू..