मोदी-शाहांनी भाजपचा दरारा वाढवला, पण त्याआधी वाजपेयी-अडवाणी जोडीने अख्खा देश गाजवला
1002 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१२ नोव्हेंबर १९९५.. स्थळ - मुंबईतील शिवाजी पार्कचं मैदान.. १५ वर्षांपूर्वीच स्थापना झालेल्या भाजपच्या महाअधिवेशनाच्या समारोपाची भव्य सभा भरली.. बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादाचा झंझावात, गोपीनाथ मुंडेंची संघर्ष यात्रा आणि प्रमोद महाजन यांच्या यशस्वी नियोजनामुळे युतीचं सरकार आल्यानंतरचा हा पहिलाच जंगी कार्यक्रम होता.. व्यासपीठावर भाषणासाठी लालकृष्ण अडवाणी उभा राहिले आणि त्यांनी काही क्षणात असा बॉम्ब टाकला ज्याचे हादरे दिल्लीपर्यंत बसले.. अडवाणींनी कुणाच्याही ध्यानीमनी नसलेला निर्णय जाहीर केला.. पंतप्रधानपदाच्या स्वप्नाचं बलिदान दिलं आणि मित्राचं नाव पुढे केलं, अटल बिहारी वाजपेयींच्या नावाची घोषणा केली.. सगळे स्तब्ध झाले.. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्या मैत्रीची आज चर्चा होते, पण त्यापूर्वी भाजपातही अशीच एक जोडी होती, या जोडीतल्या वाजपेयींनी पुढच्या दहा वर्षात म्हणजे २००५ ला मुंबईतच आणखी एक बॉम्ब टाकला, पण यावेळी हादरा फक्त अडवाणींना नाही, तर अख्ख्या देशाला बसणार होता.. याच अडवाणी-वाजपेयी जोडीच्या मैत्रीची स्टोरी आजच्या व्हिडीओत पाहू...