शंकररावांनी वेगळा पक्ष काढला, शरद पवारांना साथ दिली, आता अशोक चव्हाणांचीही काँग्रेसला सोडचिट्ठी
1564 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करासाल... १९७७.. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटलांमध्ये उभा संघर्ष निर्माण झाला... वसंतदादांच्या गटाच्या कुरघोडीमुळे शंकररावांना खुर्ची खाली करावी लागली... या घटनेमुळे शंकरराव पुरते नाराज झाले अन् काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला... आता याच शंकररावांच्या लेकानेही काँग्रेसला रामराम केलाय.. पक्षात वापसी करून शंकररावांनी शेवटचा श्वास काँग्रेसमध्येच घेतला.. पण अशोकरावांनी आपल्या खांद्यावरून काँग्रेसचा झेंडा उतरवलाय. चव्हाणांच्या दोन पिढ्यांचं काँग्रेसमधलं राजकारण कसं होतं, काँग्रेसने चव्हाणांच्या दोन पिढ्यांचं राजकारण कसं सेट केलं? याचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू....