महागाई वाढली की बँका कर्जाचे हप्तेही वाढवतात, हे आहे त्यामागचं कारण
1006 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराखिशात पैसे होते म्हणून लोक आतापर्यंत खरेदी जोमाने करत होते. पण आरबीआयने आता याला वेसण घातलीय.. घर, वाहन किंवा इतर कोणतीही गोष्ट कर्ज काढून घ्यायची असेल तर कर्जाचा हप्ता वाढणार आहे. कारण, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अचानक वाढ केलीय. पण सातत्याने रेपो दरात कपात करणाऱ्या आरबीआयने अचानक हा धक्का का दिला, रेपो आणि रिवर्स दरात बदल का केले जातात, बाजारातला पैसा अचानक कमी करुन तो बँकेत खेळता व्हावा असा उद्देश का असतो.. आरबीआयच्या या सगळ्या बाबी समजून घेऊ सोप्या शब्दात.. नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करुन सर्वसामान्यांना धक्का दिलाय. या दरवाढीनंतर बँकेचा रेपो दर ४.४० टक्के झालाय. पण आरबीआयच्या तांत्रिक गोष्टींमध्ये शिरण्याआधी रेपो आणि रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय ते सोप्या शब्दात समजून घेऊ..