पंडित घराण्याच्या वर्चस्वाला सुरूंग लावला, पण अजितदादांच्या बंडाने गेम झाला
1265 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करागेवराईचं राजकारण कायमच पंडित परिवाराभोवती फिरत आलंय. कित्येक पक्षांचं वारं आलं आणि ओसरलंही. पण चार दशकांपासून गेवराईच्या राजकारणात पंडितांचा पॅटर्न चालतो. अगोदर शिवाजीराव पंडितांनी गेवराईचं एकहाती वर्चस्व राखलं. पुढे बदामराव पंडितांनी शिवाजीरावांना आव्हान दिलं. त्यानंतर अमरसिह पंडितांनी बदामरांवर मात केली.. मात्र दोन पंडितांच्या वादात तिसऱ्यानेच झेप घेतली आणि लक्ष्मण पवार आमदार झाले. पंडितांचा बोलबाला असतानाही २०१४ ला लक्ष्मण पवारांनी भाजपला विजय मिळवून दिला.. पण भाजपने अजितदादांना सामावून घेतल्याने लक्ष्ण पवारांची चांगलीच कोंडी झालीय. अमरसिंह पंडितांनी अजितदादांना साथ दिल्याने गेवराईची समीकरणं पुरती बदललीत. अमरसिंह पंडितांच्या बदलत्या भुमिकेमुळे लक्ष्मण पवारांची कशी कोंडी झालीय, तेच या व्हिडीओत पाहू.