पृथ्वीराज चव्हाणांनी उद्घाटन केलं, ११ किमी मेट्रोला १२ वर्ष लागले, फडणवीसांनी झटक्यात विषय संपवला
5566 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा१ मे २०११... याच दिवशी पृथ्वीराज चव्हाणांनी नवी मुंबईतल्या पहिल्या मट्रो प्रकल्पाचं भूमीपूजन केलं.. याच दिवशी नवी मुंबईची मेट्रो फक्त ३ वर्षात रुळावर आणू असा शब्दही दिला.. पण पुढे याच प्रकल्पाने मुंबई महानगर प्रदेशातला सर्वात विलंब झालेला प्रकल्प असं नावलौकिकही मिळवलं.. कारण, फक्त ११ किमीच्या या प्रकल्पासाठी तब्बल १२ वर्ष लागली.. पुढे २०१४ ला फडणवीसांचं सरकार आल्यानंतर २०१७ ला या प्रकल्पाकडे नव्या सरकारचं लक्ष गेलं. फडणवीसांनी याकडे लक्ष घातलं, सिडकोला लागेल तेवढा निधी दिला आणि झपाट्याने काम सुरू केलं.. सर्वात जास्त रखडलेला मेट्रो प्रकल्प फडणवीसांच्या एंट्रीनंतर कसा वेगाने धावला आणि नवी मुंबईकरांना मेट्रोची सफर कधी करता येईल तेच या व्हिडीओत पाहू..