Shantigiri Maharaj : २००९ च्या पराभवानंतर शांतीगिरी महाराज संतांच्या भूमीतून लोकसभेसाठी मैदानात
1447 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब कराऔरंगाबाद, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि जालना या जिल्ह्यामध्ये मोठा जनसंपर्क आणि भक्त असलेले महाराज म्हणजे शांतीगिरी महाराज... १९८९ ला जनार्धन स्वामी यांचं निर्वाण झाल्यावर २५ डिसेंबर १९८९ पासून शांतीगिरी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. शांतीगिरी महाराज संन्यास स्वीकारत योगी झाले अन् नाशिक संभाजीनगर जवळ असलेल्या जनार्धन स्वामी मठाचे ते मठाधिपती झाले. २००९ ला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना आव्हान दिलं. अपक्ष लढून एक लाख ४८ हजार मतं मिळवली. पण पराभव होताच राजकारणापासून काहीसे दूर गेले. आता याच शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय.. शांतीगिरी महाराज नेमके कोण आहेत? नाशिक लढविण्याचा त्यांचा प्लॅन काय आहे? नाशिक लोकसभा मतदारसंघात सध्या काय सुरू आहे? या व्हिडिओत पाहू.....