भूमिपूजन आणि लोकार्पणही स्वतः मोदीच करणार, समुद्रातून प्रवासाचा थरार देणारा अटल सेतू पाच वर्षात तयार
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करा
आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारा भूपेन हजारिका पूल, सर्वात उंचीवर तयार केलेला अटल बोगदा, आणि त्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईला जवळ आणणारा अटल सेतू.. मोदी सरकारच्या काळातले असे काही प्रकल्प ज्यांना फक्त देशातच नाही तर जगातल्या सर्वात मोठ्या प्रकल्पांच्या यादीत स्थान मिळालं.. ज्याचं भूमिपूजन केलं त्याचं उद्घाटन करायचं हा मापदंडच मोदींनी घालून दिला आणि २०१४ नंतर एकापेक्षा एक वरचढ असे प्रकल्प सुरू केले, त्यापैकीच मुंबईची ताकद वाढवणारा प्रकल्प होता शिवडी न्हावा शेवा लिंक रोड.. समुद्रातून प्रवासाची सफर घडवणारा आणि मुंबईहून नवी मुंबई फक्त २० मिनिटांवर आणण्याऱ्या ज्या प्रकल्पाचं उद्घाटन स्वतः नरेंद्र मोदीच करतायत तो अटल सेतू कसा अद्भुत आहे तेच या व्हिडीओत पाहू..