बाजार समितीच्या आर्थिक ताकदीमुळे मोठे नेतेही या निवडणुकीत स्वतः लक्ष घालतात
1123 views
मटा ओरिजनल चे व्हिडिओ सबस्क्राईब करामोठ्या विक्रेत्यांकडून होणारं शोषण आणि फसवणुकीपासून शेतकर्यांना संरक्षण देण्यासाठी आणि कृषीमालाला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी १८८६ साली वाशिम जिल्ह्यात भारतातील सर्वात पहिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची अर्थात APMC ची निर्मिती झाली...संचालक होण्याच्या धडपडीतून या समित्यांमध्येही हायव्होल्टेज राजकारण चालतं. बाजार समितीचं राजकारणं का महत्वाचं असतं, यांचे मतदार कोण असतात, सदस्य कोण असतात, अधिकार काय असतात, ग्रामीण अर्थव्यवस्थेतली एपीएमसीची भूमिका काय असते, राजकारणाच्या दृष्टीने एपीएमसी का महत्वाची असते या सगळ्या प्रश्नांची सोप्या शब्दात उत्तरं या व्हिडीओत समजून घेऊ..