मोहम्मद शमीला अटक करु नका, दिल्ली पोलिसांनी मुंबई पोलिसांना विनंती का केली?
1792 views
देश-विदेश चे व्हिडिओ सबस्क्राईब कराभारतीय क्रिकेट संघाने विश्वचषका २०२३ च्या उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मोहम्मद शमीने ७ विकेट घेत भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. संपूर्ण देश या विजयाचा आनंद साजरा करत असून, सोशल मीडियावरही हा जल्लोष साजरा केला जात आहे. सोशल मीडियावर तर चाहत्यांनी धुमाकूळ घातला आहे. चाहते मेसेज, व्हिडिओ आणि मीम्सच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत आहेत. पण या सगळ्यामध्ये कोणीच मागे राहिले नाही, ना चाहते, ना सेलिब्रिटी, ना विविध क्षेत्रातील खेळाडू; सगळेच भारताच्या विजयात सामील झाले आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताच्या नेत्रदीपक विजयानंतर मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यात सोशल मीडियावर रंजक चर्चा रंगली.