भारत सोडण्याच्या तयारीत असलेल्या बुमराहने आईचा सल्ला ऐकला अन् नशीब बदललं
2991 views
क्रीडा चे व्हिडिओ सबस्क्राईब करापरराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागच्या वर्षात 87 हजार नागरिकांनी भारत सोडला.. चांगला पैसा, राहणीमान आणि उत्तम भविष्यासाठी अनेकजन पाश्चिमात्य देशांची निवड करतात.. त्यातही भारतीयांचा सर्वाधिक कल कॅनडाकडे असतो.. स्थलांतर करून कोणाचं नशीब बदलतं तर काहींसाठी आयुष्य आणखी कठीण होऊन बसतं तरीसुद्धा तुमच्याआमच्यासारखे अनेकजन सगळं दावावर लावून आणि देश सोडतात.. असंच सगळं दावावर लावून भारताचा यशस्वी गोलंदाज कधीकाळी भारत सोडून जाण्याच्या तयारीत होता.. प्रत्येक खेळाडूचं टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न असतं.. प्रत्येक खेळाडूला वाटतं त्या अकरा खेळाडूंंमध्ये आपल्यालाही संधी मिळावी पण इतक्या मोठ्या देशात प्रत्येकालाच स्थान मिळेल असं नाही.. अशाच असुरक्षिततेमुळे अनेकजन प्लॅन बी तयार ठेवतात.. नशिबाने क्रिकेटमध्ये साथ न दिल्यास बुमराचाही प्लॅन बी तयार होता.. तो भारत सोडून कॅनडात जाणार होता असं स्वत: बुमराहनेच एका खासजी कार्यक्रमात सांगितलंय..